मुंबईतील नागपाडा येथे मोठी दुर्घटना घडली आहे. पाण्याची टाकी साफ करण्यासाठी आत उतरलेल्या पाच मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पाण्याची टाकी साफ करण्यासाठी मजूर टाकीमध्ये उतरले होते. मात्र जीव गुजमरल्यानं त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांना तातडीनं अग्निशमन दलाच्या मदतीनं मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केलं आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.