महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी, वारे ताशी 30-40 किमी वेगाने वाहण्याची शक्यता

लेखणी बुलंद टीम:

रविवारी अति आर्द्रता असलेल्या मुंबईला पावसाने दिलासा दिला आहे. ज्यामुळे शहरातील धुके कमी झाले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर 13 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि 30-40 किमी ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत, मुंबईच्या अनेक भागांमध्ये जोरदार वारे आणि धुळीच्या वादळासह हलका पाऊस झाला.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील एक ते दोन तासांत पनवेल, नवी मुंबई, दक्षिण मुंबई आणि पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. IMD ने पुढील तासासाठी सक्रिय वाऱ्याच्या वेगाचा अंदाज वर्तवला आहे. तथापी, कल्याण आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन (MMR) च्या अंतर्गत भागात गडगडाटी वादळे निर्माण होतील. परिणामी काही भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुढील 24 तासांत, मुंबई आणि उपनगरात सकाळ आणि दुपारच्या वेळी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहील, संध्याकाळी हलका पाऊस किंवा सरी पडण्याची शक्यता आहे. मुंबई शहरात कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचेल आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *