बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारतात राहिल्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम होईल का?

लेखणी बुलंद टीम:

 

5 ऑगस्ट 2024 रोजी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक रूप मिळाल्यानंतर शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी भारत गाठला.

 नव्या सरकारचा भारताशी ताळमेळ कसा आहे, याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.शेख हसीना आणि त्यांचा अवामी लीग पक्ष भारताचा समर्थक आहे, असं मानलं जातं. संकटकाळात त्यांनी भारतात येणं यावरून दोन्ही देशातील संबंध किती गहिरे आहेत, हे दिसून येतं. मात्र, बांगलादेश सरकारने स्पष्ट केलं आहे की, शेख हसीना भारतात कितीही काळ राहिल्या तरी त्याचा दोन्ही देशांच्या संबंधांवर काहीही परिणाम होणार नाही.अंतरिम सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहार विभागाचे सल्लागार मोहम्मद ताौहिद हुसैन म्हणाले की, बांगलादेश कायम भारताशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करेल.

 

भारतासोबतच्या संबंधांवर बांगलादेशची भूमिका काय आहे?

मंगळवारी (6 ऑगस्ट) परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी बांगलादेशच्या परिस्थितीवर राज्यसभा आणि लोकसभेत निवेदन दिलं. शेख हसीना यांचं भारतात येणं आणि बांगलादेशमध्ये असलेल्या भारतीय नागरिक आणि तिथल्या अल्पसंख्यांकाच्या स्थितीची माहिती दिली.

 

जयशंकर म्हणाले की, शेख हसीना भारतात आल्या आहेत आणि त्यांचं विमान दिल्लीत आलं आहे. ते म्हणाले, “5 ऑगस्टला संचारबंदी असताना देखील निदर्शक ढाक्यात एकत्र आले होते. आम्हाला जितकं कळलं आहे, त्यानुसार संरक्षण दलांबरोबर झालेल्या बैठकीनंतर शेख हसीना यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

“अगदी शॉर्ट नोटीसवर त्यांनी भारतात येण्याची परवानगी मागितली. त्यानंतर आम्ही लगेच बांगलादेश प्रशासनाने फ्लाईट क्लिअरन्सची परवानगी मागितली आणि आम्ही ती तातडीने दिली. त्या दिल्लीला आल्या आहेत.”

 

बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहिन हुसैन यांना प्रश्न विचारला गेला की, शेख हसीना भारतात बराच काळ थांबू शकतात, अशा परिस्थितीत दोन्ही देशांमधल्या संबंधांवर काय परिणाम होईल? द्विराष्ट्रीय संबंध हा मोठा विषय असल्याचे सांगत ते म्हणाले, “हा एक काल्पनिक प्रश्न आहे. जर एखादी व्यक्ती एखाद्या देशात राहत असेल, तर त्याने दोन देशांच्या संबंधांवर काय परिणाम होणार आहे? असं काहीच कारण नाही.”

 

शेख हसीना सरकारी नोकरीत वादग्रस्त कोट्याविरुद्ध झालेल्या देशव्यापी आंदोलनानंतर बांगलादेश सोडून भारतात आल्या.हुसैन म्हणाले की, “द्विराष्ट्रीय संबंध एक दुसऱ्याच्या हितसंबंधांवर आधारित असतात. मैत्रीसुद्धा हितसंबंधांसाठीच होते. जर हितसंबंधांवर काही परिणाम झाला तर पर्यायाने मैत्रीवर परिणाम होईल.”

 

ते पुढे म्हणाले की, “बांगलादेश आणि भारताचे आपले काही उद्दिष्ट आहेत. ते त्यानुसार पुढे जातील. आमचं सरकार कायम भारताबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल.”दरम्यान, स्टेट हाऊसमधील आपल्या ऑफिसमध्ये काही पत्रकारांशी बोलताना मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे सल्लागार होण्याामागची गोष्ट सांगितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *