30 जून ते 18 जुलै या काळात पार पडणार राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन

लेखणी बुलंद टीम:

 

 

 

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम आणि वेळापत्रक समोर आलं आहे. त्यानुसार आजपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. सकाळी ११ वाजता विधानसभेचं कामकाज सुरू होणार आहे. यंदा 30 जून ते 18 जुलै या काळात राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होणार आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारला विरोधक चांगलंच कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. दरम्यान, विविध प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. यंदा राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्रिभाषा सूत्र, हिंदी भाषा विरोध, शक्तीपीठ महामार्ग, जनसुरक्षा कायदा, शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत या मुद्द्यांवरून अधिवेशन गाजताना दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *