मुंबई शहराला आज ऑरेंज अलर्ट जारी ; 5 ऑक्टोबर पर्यंत मुंबईतून पाऊस माघारी फिरणार

लेखणी बुलंद टीम:

मुंबई मध्ये काल पावसाने धुमाकूळ झाल्यानंतर आज थोडी विश्रांती घेतल्याचं चित्र आहे. सध्या मुंबई आणि आजूबाजूच्या भागातून पावसाने उसंत घेतली आहे. आज पालघर वगळता मुंबई आणि आजुबाजूच्या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर मध्ये पावसाचा प्रभाव पाहता तेथे रेड अलर्ट कायम आहे. आता हळूहळू पावसाचा प्रभाव कमी होऊन हा अलर्ट ग्रीन आणि यलो होईल असेही आयएमडी ने स्पष्ट केले आहे. मुंबई मधून पाऊस दरवर्षी प्रमाणे 5 ऑक्टोबरच्या आसपास माघार घेईल तर महाराष्ट्रातून 10 ऑक्टोबरच्या आसपास पूर्ण माघार घेतली जाईल असे IMD Director Sunil Kamble यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

पहा आयएमडीचा हवामान अंदाज काय सांगतो?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *