भारताने झेलम नदीत पाणी सोडल्यामुळे पाकिस्तानातील मुझफ्फराबादमध्ये भयंकर पूर

लेखणी बुलंद टीम:

 काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ल्याचा तपास आता एनआयएकडे देण्यात आला. या हल्ल्याप्रकरणी आता एनआयएनं देखील गुन्हा दाखल केला आहे. एनआयए या प्रकरणाची अधिकृतपणे चौकशी करेल. एनआयएचं एक पथक घटनास्थळी तपास करत आहे.
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन सुरु आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तिथे मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली.

दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली असून त्यांच्या छुप्या अड्ड्यांवर छापे मारण्यात आले. तसेच घातपाती कारवायांसाठी मदत करणाऱ्या 400 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले. कश्मीरमधील गेल्या दोन दशकांतील ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा असणारा सिंधू पाणी करार रद्द केला.यानंतर काल (26 एप्रिल) पाकिस्तानातील मुझफ्फराबाद येथील झेलम नदीत भारताने पाणी सोडले.झेलम नदीत पाणी सोडल्यामुळे मुझफ्फराबादमध्ये भयंकर पूर आला आहे.यामुळे प्रशासनाने पाण्याची आणीबाणी जाहीर केली आहे. तसेच स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय.झेलम नदीत अचानक पूर आल्याने मुझफ्फराबादमधील नागरिकांची धावपळ झाली.
दरम्यान, भारत सरकार भविष्यात पाण्याचा प्रवाह वळवण्यासह इतरही संभाव्य पर्यायांवर कायदेशीर आणि तांत्रिक दृष्टीने विचार करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *