भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाची भीती वाढत चालली आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेचे सदस्य शेर अफजल खान मारवत यांच्या एका विधानाने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. भारत पाकिस्तानचं युध्द झालं तर ते देश सोडण्याबद्दल भाष्य करत आहेत. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर कठोर निर्णय घेतले आहेत, त्याचाच एक भाग म्हणजे अलीकडेच पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व आयातींवर भारताने बंदी घातली आहे, पाकिस्तानच्या मालकीच्या जहाजांना भारतीय बंदरांवर येण्यापासून रोखले आहे आणि पाकिस्तानी पोस्ट आणि पार्सलच्या देशात प्रवेशावर बंदी घातली आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाची भीती वाढत चालली आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेचे सदस्य शेर अफजल खान मारवत यांच्या एका विधानाने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. एका पत्रकाराने त्यांना विचारले की जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर ते त्यावेळी काय करतील, कोणता निर्णय घेतली. त्यावर मारवत यांनी सहजतेने उत्तर दिलं, “जर भारत पाकिस्तानचं युद्ध झालं, तणाव वाढला तर मी इंग्लंडला जाईन.”
पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेचे सदस्य शेर अफजल खान मारवत याचं हे विधान काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झालं. लोकांनी पाकिस्तानच्या राजकारणावर टीका केली आणि म्हटले की, जेव्हा नेत्यांना त्यांच्या सैन्यावर विश्वास नाही, तर सामान्य लोकांनी काय अपेक्षा करावी? जेव्हा एका पत्रकाराने मारवत यांना विचारले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तणाव कमी करण्यासाठी संयम बाळगावा का? तेव्हा मारवत यांनी मिश्कील अंदाजामध्ये उत्तर देत म्हटलं की, “नरेंद्र मोदी हे माझ्या मावशीचा मुलगा आहेत का? की, ते माझ्या म्हणण्यावरून मागे हटतील?”
शेर अफजल खान मारवत हे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) शी संबंधित आहेत, परंतु अलिकडच्या काळात त्यांनी पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वावर टीका केली आहे. यामुळे संतप्त होऊन इम्रान खान यांनी त्यांना पक्षातील अनेक महत्त्वाच्या पदांवरून काढून टाकले.
शनिवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरसह अनेक भागात लहान शस्त्रांनी गोळीबार करून युद्धबंदीचे उल्लंघन केले. सीमेवर पाकिस्तानकडून सलग दहावी रात्र गोळीबार झाला आहे. भारतीय सैन्याने लगेचच प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य केले.