ठाणे जिल्ह्यातील रॅसिनो फार्मा या केमिकल कंपनीला भीषण आग

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरात भीषण आग लागली होती. आनंदनगर एमआयडीसी परिसरात असलेल्या रॅसिनो फार्मा या केमिकल कंपनीला रविवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. आग इतकी भीषण होती की धुराचे मोठमोठे ढग दूरवरून दिसत होते.

मिळालेल्या माहितीनुसार आगीची माहिती मिळताच अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरसह आसपासच्या भागातील अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच आगीची तीव्रता लक्षात घेऊन आणखीन अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्याची तयारी सुरू आहे.

तसेच आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. या घटनेत कंपनीतील कोणी कामगार अडकला आहे का, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. अग्निशमन विभाग आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहे. प्राथमिक माहितीनुसार या आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

तसेच घटनेदरम्यान कंपनीतून स्फोटाचे आवाजही ऐकू आले. ही आग जवळच्या इतर कंपन्यांमध्ये पसरू नये यासाठी विशेष प्रयत्न केले जात गेले. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला व या फार्मा कंपनीच्या परिसराला लागून असलेल्या तीन कंपन्याही आग लागली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *