महत्वाची बातमी! ८ मे दिवशी मुंबईतील ‘हे’ विमानतळ सहा तास राहणार बंद

लेखणी बुलंद टीम:

 

 

महाराष्ट्रातील मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) सर्व विमान सेवा ८ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार आहे. धावपट्टीच्या वार्षिक मान्सूनपूर्व दुरुस्ती अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (MIAL) ने शनिवारी ही माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार एमआयएएलने म्हटले आहे की या सरावासाठी  विमानचालकांना सूचना सहा महिने आधीच जारी करण्यात आली होती जेणेकरून विमान कंपन्या त्यांच्या उड्डाणांचे वेळापत्रक वेळेत बदलू शकतील. विमानतळ व्यवस्थापनाच्या मते, धावपट्टीची सुरक्षितता आणि दीर्घायुष्य सुनिश्चित करण्यासाठी ही वार्षिक दुरुस्ती आवश्यक आहे. तज्ज्ञ धावपट्टीच्या पृष्ठभागाची पाहणी करतील आणि पावसाळ्यात पाणी साचण्यासारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी उपाययोजना करतील. अशी माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *