‘गौतम गंभीरला पत्रकार परिषदेपासून दूर ठेवणे बीसीसीआयसाठी शहाणपणाचे ठरेल’-संजय मांजरेकर

लेखणी बुलंद टीम:

माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी गौतम गंभीरवर (Gautam Gambhir) निशाणा साधत भारतीय प्रशिक्षकाला माध्यमांशी बोलण्याची शिष्टाचार नसल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर तीव्र शब्दात लिहिलेल्या पोस्टमध्ये मांजरेकर यांनी गंभीरला पत्रकारांशी संवाद साधण्यापासून रोखण्याची विनंती भारतीय क्रिकेट बोर्डाला केली. भारतीय संघ 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सोमवारी (11 नोव्हेंबर) गौतम गंभीरने पत्रकार परिषद घेतली. यानंतर मांजरेकर X वर पोस्ट शेअर केली.
संजय मांजरेकरचा बीसीसीआयला सल्ला

संजय मांजरेकर यांनी X वर लिहिले, “मी नुकतेच गौतम गंभीर यांना पत्रकार परिषदेत पाहिले. त्यांना अशा कामापासून दूर ठेवणे आणि पडद्याआड काम करू देणे हेच बीसीसीआयसाठी शहाणपणाचे ठरेल. त्यांच्याकडे बोलण्याची पद्धत नाही आणि योग्य शब्दही नाहीत. रोहित आणि आगरकर मीडियाला सामोरे जाणे चांगले.

गौतम गंभीरची पत्रकार परिषद

गंभीरने कठीण प्रश्नांना आत्मविश्वासाने आणि स्पष्टपणे उत्तरे दिली. विराट कोहलीवर टीका करणाऱ्या रिकी पाँटिंगवर गंभीरने निशाणा साधला. स्टार फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियात आपला फॉर्म परत मिळवण्यावर विश्वास व्यक्त केला. शार्दुल ठाकूर यांच्याऐवजी नितीश रेड्डी यांची निवड करण्याच्या निर्णयाचाही त्यांनी बचाव केला. याशिवाय, नियमित कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे उपस्थित नसल्यास, उपकर्णधार जसप्रीत बुमराह पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व करेल याची पुष्टी झाली.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

भारतीय संघ नोव्हेंबर 2024 च्या उत्तरार्धात ते जानेवारी 2025 च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघाने मागील 2 ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चमकदार कामगिरी करत मालिका जिंकली आहे. मात्र, यावेळी भारतीय संघाचा मार्ग सोपा नसेल. WTC फायनलच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. याबाबत गंभीर म्हणाला की, संघाचे लक्ष बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करण्यावर असेल, पॉइंट टेबलवर नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *