साप्ताहिक राशिभविष्य: ९ ते १५ मार्च २०२५

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मेष

१४ तारखेला दुपारनंतर १५ तारखेचा संपूर्ण दिवस असा हा दीड दिवसांचा कालावधी जेमतेम राहील. म्हणजे या दिवसांत कोणतेही काम करताना दूरदृष्टी ठेवा. जबाबदारीचे भान ठेवा. इतरांनी काय करावे त्यापेक्षा स्वत:ला काय करायचे आहे याचा पहिला विचार करा. स्वत:च्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालू नका, म्हणजे त्रास होणार नाही. होळी पौर्णिमेचा दिवस आनंदाचा असेल. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातील सध्याची परिस्थिती चांगली असेल. भागीदारी व्यवसायातील करार करावयास हरकत नाही.

वृषभ

सप्ताहातील सर्व दिवस चांगले असतील. कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. येणारे चांगले प्रस्ताव कामात यश मिळवून देणारे आहेत. सध्या इकडे तिकडे बघायला वेळसुद्धा मिळणार नाही, तुम्हाला तुमच्या कामातून वेळच मिळणार नाही. असे दिवस असले की तुम्हीसुद्धा आनंदी असता. होळी पौर्णिमा सर्वांसोबत उत्साहाने साजरी कराल. व्यवसायात आतापर्यंत अशी स्थिती होती की गुंतवणूक कुठून करायची, फायदा किती मिळेल, अशी चिंता वाटत होती. सध्या मात्र हरकत नाही गुंतवणूक मोठी करायला, फायदा चांगला मिळेल. एकूणच सफलता चांगली मिळेल. नोकरदार वर्गाचे कामातील नियोजन यशस्वी होईल. नातेवाईकांशी संपर्क साधाल. शेजाऱ्यांना मदत कराल.

मिथुन

गेल्या आठवड्यातील काही दिवस असे होते मनाची द्विधा अवस्था व्हायची. कोणता निर्णय घ्यावा याबाबत काहीच निश्चय होत नव्हते, कारण दिवस चढउताराचे होते. त्यात नुकसान होईल असे नेहमी वाटत होते. आता या सर्व गोष्टींतून तुमची मुक्तता होणार आहे. खरंच हा सप्ताह शुभ असणार आहे. काळजी करू नका. सध्या आपल्याला जे वाटते ते मनमोकळेपणाने बोलल्यामुळे बरेच काही साध्य होईल. चांगले दिवस असले की कामेही होतात आणि सगळे जण तुमच्याशी चांगलेही वागतात याचा अनुभव तुम्हाला येईल.

कर्क

दिनांक ९ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. होळी पौर्णिमेदिवशी लक्ष्मी प्रसन्न राहील असा दिवस आहे. आतापर्यंत ज्या गोष्टीविषयी चिंता वाटत होती ती आता मिटणार आहे. जबाबदारी कोणतीही असो, मात्र ती पार पाडल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. कारण एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव साध्य होणार आहे. ध्येय गाठणे अवघड होणार नाही. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येईल. आर्थिक बाबतीत समाधानाची बाब राहील. समाजसेवेची आवड राहील. कौटुंबिक जीवन सुखाचे राहील. शेजाऱ्यांशी मात्र जेवढ्यास तेवढे राहा.

सिंह

दिनांक १०, ११ या दोन दिवसांत प्रयत्न करत राहा. फळाची अपेक्षा धरू नका. कारण या दिवसांत कामाचे फळ उशिरा मिळणार आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. शिवाय या दिवसांत आपला ज्या गोष्टीशी संबंध नाही त्या गोष्टींमध्ये उगीचच ढवळाढवळ करू नका. कारण गोष्टी अंगलट येऊ शकतात. तेव्हा हे दिवस शांततेत पार पाडा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. होळी पौर्णिमा तुमच्या राशीतूनच होत आहे. हा दिवस आनंदी असेल. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले असेल. नवे तंत्र विकसित होईल. नोकरदार वर्गाला आपले मत मांडण्याचा अधिकार राहील. आर्थिक बचत करा. राजकीय क्षेत्रात न जमणाऱ्या गोष्टींची जबाबदारी घेऊ नका. कुटुंबातील सदस्यांचा आदर करा.

कन्या

दिनांक १२, १३ हे संपूर्ण दोन दिवस १४ तारखेला दुपारपर्यंत असे हे दिवस चांगले कसे जातील हेच पाहा. कारण या दिवसांत एखादी जबाबदारी घ्यायची नसली तरी ती घ्यावी लागते. इच्छा नसताना काम करावे लागते अशी परिस्थिती निर्माण होते, त्यामुळे तुम्हाला राग येतो. मग तो आजूबाजूच्या लोकांवर निघतो. परिणामी गैरसमज निर्माण होतात. तेव्हा शांततेच्या मार्गाने सर्व गोष्टी हाताळा. प्रत्येक गोष्टीत समतोल साधा म्हणजे त्रास होणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. होळी पौर्णिमा सर्वांसोबत आनंदाने साजरी करा. भागीदारी व्यवसायात नवीन गुंतवणूक करावयास हरकत नाही. मात्र अशी गुंतवणूक करताना करार करणे योग्य राहील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे बोलणे खावे लागेल. आर्थिकदृष्ट्या खर्चाचे नियोजन करा. घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पाहा. प्रकृतीची काळजी घ्या.

तूळ

१४ तारखेला दुपारनंतर १५ तारखेचा संपूर्ण दिवस असा हा दीडच दिवस फक्त अनुकूल नाही. बाकी दिवसांचा कालावधी खूप चांगला राहील. चांगल्या कालावधीमध्ये वेळ वाया न घालवता कामाकडे लक्ष द्या. कारण काम पूर्ण होणारेच हे दिवस आहेत. तेव्हा विचार कसला करताय, आपल्या कामाची जबाबदारी इतरांवर न देता स्वत:च करा. यश नक्की मिळेल. प्रत्येक गोष्टीत आपले तेच खरे करण्याची वेळ आली आहे असे समजा.

वृश्‍चिक

दिनांक ९ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांत चंद्र ग्रहाचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानात होत आहे. ही एक प्रकारची संधी आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण दिवस चांगले असतात त्यावेळी कोणतीही गोष्ट अंगलट येत नाही. आपण म्हणू तीच पूर्व दिशा असते. शिवाय आपले मत इतरांना पटणारे असते, त्यामुळे सर्व दिवस चांगले असल्याचा आनंद आपल्याला मिळतो आणि आपली हुशारी इतकी आहे की आपण अशा कालावधीत आपला हात धुऊन घेतो. होळी पौर्णिमा घरातील सर्वांसोबत उत्साहाने साजरी कराल.व्यवसायात लाभ होईल. नोकरदार वर्गाला नवीन कामाचे नियोजन करावे लागेल. यश मिळेल. नातेवाईकांशी संवाद साधाल. शेजाऱ्यांना मदत कराल. धार्मिक कार्यात सहभाग राहील.

धनु

९ तारखेला दुपारनंतर दिनांक १०, ११ संपूर्ण दोन दिवस असा हा अडीच दिवसांचा कालावधी चांगला आहे असे म्हणता येणार नाही. कारण या दिवसांत नको ती भानगड मागे लागू शकते, तेव्हा आधीच सावध व्हा. उचलली जीभ लावली टाळ्याला असे करू नका. बोलताना शब्द जपून वापरा म्हणजे नुकसान होणार नाही. आपल्याकडून इतरांचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. होळी पौर्णिमा भाग्यस्थानातून होत आहे. आनंदी दिवस असेल. व्यवसायात खरेदी- विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. अनपेक्षितपणे आर्थिक लाभ होतील. राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढेल. नातेवाईकांच्या कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील. जोडीदाराचा आदर करा. धार्मिक कार्याची आवड राहील. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा.

मकर

षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे होणारे चंद्राचे भ्रमण शुभ नाही. सध्या आपण जे करणार ते पालथ्या घड्यावर पाणी असणार आहे. तेव्हा कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. काम करत राहा. फळाची अपेक्षा ठेवली तर त्रास होईल अशी परिस्थिती या सप्ताहात आहे. आजचा दिवस फार चांगला गेला नाही उद्याचा चांगला जाईल अशी सकारात्मक भावना ठेवा म्हणजे खरेच चांगले होईल. नकारात्मक विचारांमुळे गोष्टी चांगल्या घडत नाहीत हे लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीत तडजोड स्वीकारा. होळी पौर्णिमेदिवशी अतिधाडस करणे टाळा. व्यवसायात इतरांवर अवलंबून न राहता स्वत: प्रयत्नशील राहा. नोकरदार वर्गाचे कामकाज चालू असतानाच काहीतरी तांत्रिक अडचणी येऊ शकतात. आर्थिक फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबाचा आदर करा. आरोग्याकडे लक्ष द्या.

कुंभ

९ तारखेला दुपारनंतर दिनांक १०, ११ असे संपूर्ण दोन दिवस, १४ तारखेला दुपारनंतर व १५ तारखेचा संपूर्ण दिवस असे हे दिवस चढउतारांचे आहेत हे वेळीच लक्षात घ्या. इतरांवर अवलंबून राहिल्यास कोणतेच काम होणार नाही, त्यामुळे तुमच्या मनामध्ये एक प्रकारचा गैरसमज निर्माण होणार. गैरसमज लवकर दूर होणार नाही, त्यामुळे आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालू नका. वेळेचे भान ठेवा म्हणजे नुकसान होणार नाही. एखाद्या कामाला उशीर लागला तरी चालेल, पण ते काम चांगले करा. होळी पौर्णिमेचा दिवस चांगला असेल. व्यवसायात मोठी गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाला नियमांचे पालन करावे लागेल. राजकीय क्षेत्रात सध्या तरी मनमोकळेपणाने विचार मांडू नका. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा. आरोग्याची काळजी घ्या.

मीन

दिनांक १२, १३ संपूर्ण दोन दिवस व १४ तारखेला दुपारपर्यंत असे हे अडीच दिवस अनुकूल कसे जातील ते पाहा. या दिवसांत होऊन गेलेल्या गोष्टींसंदर्भात चर्चा करू नका. एखाद्याला सल्ला द्यायचा झाला तर तो चांगल्या दिवसांत द्या. हे दिवस चांगले नसल्यामुळे तुमचा सल्ला तुम्हालाच त्रासाचा राहील. दुसऱ्यांच्या वैयक्तिक गोष्टींत हस्तक्षेप करू नका. मध्यस्थी टाळा म्हणजे त्रास होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. होळी पौर्णिमेदिवशी मात्र बेकायदेशीर गोष्टींच्या नादी लागू नका. व्यवसायात इतरांच्या बोलण्यावरून व्यवसायाचे स्वरूप बदलणे नुकसानीचे राहील हे लक्षात ठेवा. नोकरदार वर्गाला जबाबदारीने काम पार पाडावे लागेल. उधारीचे व्यवहार टाळा. मुलांच्या बाबतीत घेतलेले निर्णय योग्य असतील. मित्र-मैत्रिणींशी संवाद साधाल. घरामध्ये ज्येष्ठांनी व्यक्त केलेल्या मतांना प्राधान्य द्या. प्रकृती ठीक राहील.

 

(टीप : वरील सर्व बाबी लेखणी बुलंद केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लेखणी बुलंद कोणताही दावा करत नाही.)


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *