बदलापूर अत्याचार प्रकरणात राज्य सरकारने उचललं ठोस पाऊलं

Spread the love

लेखणी  बुलंद टीम:

बदलापूर इथल्या नागरिकांचा संताप आणि झालेला गंभीर प्रकार लक्षात घेत सरकारने ठोस पावलं उचलली आहेत. राज्याचं गृहखातं अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेच्या तपालासा आता वेग आला आहे.

 

फडणवीसांचे पोलीस आयुक्तांना आदेश
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून या बाबतचं ट्विट करण्यात आलं आहे. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत, असं या ट्विटमध्ये म्हणण्यात आलं आहे.

 

बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी…

 

बदलापूरमधील नामांकित शाळेत स्वच्छता कर्मचाऱ्याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणातील आरोपीला अटक झाली आहे. पॉक्सोची केस या प्रकरणी दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोली अधिक तपास करत आहेत. या चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचारानंतर बदलापूरकर रस्त्यावर उतरले आहेत. रेल्वे रूळावर उतरत नागरिकांनी रेल रोको केला. यावेळी या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *