त्या तीन मुलींनी जे आरोप केले आहेत तस काही घडल नसल्याचा दावा पुणे पोलिसांचा दावा

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

पोलिसांनी मारहाण केली, शिवीगाळ केली, जातीवाचक शब्द वापरले या कोणत्याचा आरोपात तथ्य नसल्याने पोलिसांवर गुन्हा दाखल होऊ शकत नाही असं पुणे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं. पुण्यातील कोथरूड पोलिसांनी मारहाण केली आणि जातीवाचक शब्द वापरले असा आरोप तीन मुलींनी केला होता. मात्र त्यांचे सगळे आरोप पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी फेटाळून लावले आहेत. असा कोणताही प्रकार घडला नाही आणि पोलीस कर्मचारी प्रेमा पाटील यांचा त्यामध्ये काही संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

या संपूर्ण प्रकरणात काहीही तथ्य नाही त्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकत नाही. ॲट्रॉसिटीची मागणी त्या मुली करत आहेत. या प्रकरणात त्या मुली कशाचीही मागणी करू शकतात असंही स्पष्ट मत पोलिसांनी व्यक्त केल आहे.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले की, “छत्रपती संभाजी नगरची एका मिसिंग महिलेची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याचा तपास करण्यासाठी पोलीस पुण्यात आले होते आणि त्यांना आम्ही दोन दामिनी मार्शल दिले. कोथरूड पोलीस स्टेशनला त्यांनी पत्र देऊन महिला कर्मचारी गरज असल्याचं सांगितलं होतं, तसा लेखी अर्ज दिला होता. महिला सहाय्यता कक्ष आणि हिरकणी कक्ष या ठिकाणी या महिलेची चौकशी केली. यात मिसिंग मुलगी होती ती ट्रेस झाली आणि तिचे वन स्टॉप सेंटर कोंढव्यात होते हे दिसून आलं. त्यानंतर छत्रपती संभाजी नगरचे जे पथक होतं ते पथक मुलीला घेऊन निघून गेले.”

पोलीस उपायुक्त संभाजी कदम पुढे म्हणाले की, त्यानंतर पहाटे पोलिसांनी आम्हाला मारहाण केल्याची तक्रार संबंधित मुलींनी केली होती. यात प्रथमदर्शनी कोणत्याही तथ्य आढळून आलं नाही. अनेक कार्यकर्ते पोलीस आयुक्तालयात आले तिथेही त्यांना यात तथ्य नसल्याचे सांगितलं. या संदर्भात सगळ्यांना लेखी पत्र देऊन देखील कळवण्यात आले आहे.

या तपासादरम्यान प्रेमा पाटील यांचा काही संबंध नाही. त्या या पथकात आणि दामिनी मार्शलमध्ये नव्हत्या असं पोलिस उपायुक्तींनी सांगितलं. मुलींनी आरोप केला तसा कोणताही प्रकार घडलेला नाही. या संपूर्ण प्रकरणात काही प्रशासकीय त्रुटी आहेत, त्याचा सध्या तपास सुरू असल्याचं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *