पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय हवाई क्षेत्र ‘या’ तारखेपर्यंत बंद

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने एक मोठा निर्णय घेतला होता आणि पाकिस्तानी विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. आता हा कालावधी 23 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या चिथावणीखोर भूमिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानी प्रवासी विमाने आणि लष्करी विमाने भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश करू शकणार नाहीत. शुक्रवारी विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या ‘NOTAM’ (विमानचालकांना सूचना) मध्ये याची अधिकृतपणे पुष्टी करण्यात आली. या हालचालीचा उद्देश केवळ पाकिस्तानी हवाई कारवायांना आळा घालणे नाही, तर भारत आता जमिनीवरून असो वा आकाशातून, कोणत्याही कृतीला जोरदार प्रत्युत्तर देईल असा थेट संदेश देणे आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *