लेखणी बुलंद टीम:
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने 15 मे रोजी पहाटे 5:20 वाजेपर्यंत देशभरातील 24 विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, नागरी उड्डाण मंत्रालयाने 24 विमानतळे 10 मे पर्यंत नागरी उड्डाणांसाठी बंद राहतील, असं सांगितलं होतं.
भारतातील 24 विमानतळ 15 मे पर्यंत बंद –
The Ministry of Civil Aviation extends the closure of 24 airports across the country from May 10 to May 15 (5:29 am): Government Sources
— ANI (@ANI) May 9, 2025