लेखणी बुलंद टीम:
परभणीत हिंसाचार झाल्यानंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला. त्यानंतर वातावरण तापले. राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी सूर्यवंशींच्या कुटुंबाला भेट दिली.
न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला. त्यानंतर वातावरण तापले. राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी सूर्यवंशींच्या कुटुंबाला भेट दिली. तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी परभणी घटनेच्या संदर्भात महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रूपयांची भरपाई द्यावी अशीही मागणी ॲड. आंबेडकर यांनी केली.
ॲड. आंबेडकर यांनी केल्या या मागण्या
वाल्मिक कराड बीडचा कार्यकारी पालकमंत्री होता, आमदार प्रकाश सोळंके यांचा खळबळजनक दावा; काय दिला दाखला?
1) परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी.
2) सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्या.
3) परभणीत पोलीसांनी क्रूरतेने केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करण्यासाठी आणि पुरेशी भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करा.
4) 1 जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगावच्या अभिवादन सोहळ्यापूर्वी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांविरुद्ध कोणत्याही प्रकारचा हिंसाचार आणि चुकीची माहिती भडकावण्याच्या कोणत्याही प्रयत्नांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ते हाणून पाडण्यासाठी पोलीसांना निर्देश द्यावेत.
5) आदिवासी विद्यार्थ्यांसाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना रद्द करा आणि पूर्वीची प्रणाली पुन्हा सुरू करावी.
I met the Hon'ble Chief Minister Devendra Fadnavis this morning.
I placed certain demands —
1️⃣ Increase the 𝐜𝐨𝐦𝐩𝐞𝐧𝐬𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐭𝐨 𝐭𝐡𝐞 𝐟𝐚𝐦𝐢𝐥𝐲 𝐨𝐟 𝐒𝐨𝐦𝐧𝐚𝐭𝐡 𝐒𝐮𝐫𝐲𝐚𝐰𝐚𝐧𝐬𝐡𝐢 𝐭𝐨 ₹𝟏 𝐜𝐫𝐨𝐫𝐞;
2️⃣ Provide 𝐞𝐦𝐩𝐥𝐨𝐲𝐦𝐞𝐧𝐭 𝐭𝐨 𝐚 𝐟𝐚𝐦𝐢𝐥𝐲… pic.twitter.com/4czPp3KIE7
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) December 28, 2024