रायगड जिल्ह्यात कर्नाळा खिंडीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसचा अपघात

Spread the love

लेखणी बुलंद टीम

मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीमध्ये खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. खासगी बस कर्नाळा खिंडीत पलटली आहे.खासगी बसच्या या अपघातात तीन ते चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही.

मुंबईच्या दिशेकडून कोकणाच्या दिशेकडे जात असताना खासगी बसला अपघात झाला. कोकणात जाणाऱ्या या खासगी बसमध्ये 35 हून अधिक अडकल्याची माहिती आहे.कर्नाळा खिंडीत झालेल्या अपघातात बसमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलीस मदतीसाठी रवाना झाले आहेत.कर्नाळा खिंडीतील अपघातामुळे कर्नाळा खिंड परिसरात मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.खासगी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *