महाराष्ट्रातील उल्हासनगरमध्ये १२ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका तरुणाला अटक केली.
ही घटना ६ एप्रिल रोजी घडली जेव्हा आरोपीने पीडितेला परिसरातील एका निर्जन गल्लीत नेले आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. मुलगी पळून जाण्यात यशस्वी झाली, घरी पोहोचली आणि तिने तिच्या आईला घटनेची माहिती दिली.मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई केली आणि एफआयआर नोंदवला. तसेच ताबडतोब आरोपीला अटक केली. असे पोलीस अधिकारींनी सांगितले.