देशावर कर्ज उभा करुन मी सन्यास घेतो असे सांगतील
प्रकाश आंबेडकर म्हणाले, सनातन्यांना पुन्हा सत्तेत आणले तर दरवर्षी कर्ज वाढत राहणार आहे. सध्या देशावर 84 रुपयांचे कर्ज आहे. हे 2026 ला 100 रुपयांचे कर्ज करतील. देशावर कर्ज उभा करुन मी सन्यास घेतो असे सांगतील. देशाला बुडवून हे सन्यास घेतील. देशाला बुडवणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पंतप्रधान म्हणून संधी द्यायची का? हे ठरवा, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय.
तसेच प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सध्याचे सरकार हे डाकूंचे सरकार आहे असे मानायला हरकत नाही. देशावर कर्ज 100 रुपयांपैकी 24 रुपयांचे होते. या डाकू सरकारने हे कर्ज 84 रुपयांवर नेले. 2014 ते 2024 या कालावधीत 24 रुपयावरुन 84 रुपयांवरती नेले. जागतिक बँकेने भारताला इशारा दिलाय. आपला पगार समजा 10 हजार आहे आणि बँकेचा 10 हजारांचा हफ्ता असेल तर आपली चूल कशी पेटणार ? आपली चूल देखील पेटू शकणार नाही.”, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले. इचलकरंजी येथे वंचित बहुजन आघाडीची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी वायफळ बोलत नाही, चुकीचं काही बोलत नाही. मोदींच्या सरकारने इथल्या एअरफोर्सची वाट लावली. मनमोहन सिंगांच्या काळात 135 विमाने फ्रांसकडून विकत घ्यायची होती. सनातन वाल्यांनो किती राफेल आले सांगा आणि किती विकत घ्यायचे होते तेही सांगा. केवळ 35 विमाने आली. उरलेले 100 विमानं कधी येणार आहेत? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी देशाला बुडवत आहेत.