क्रूरतेचा कळस ! ४५ वर्षीय व्यक्तीकडून तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

महाराष्ट्रातील एका ४५ वर्षीय पुरूषाच्या क्रूरतेची कहाणी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्यावर तीन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीचे नाव कमलेश कदम (४५) असे आहे, तो पालघर जिल्ह्यातील विरार येथील रहिवासी आहे.

तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला गुजरात राज्यातून अटक केली आणि त्याची कठोर चौकशी करत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुजरात पोलिसांच्या मदतीने फरार आरोपी कमलेश कदमला सुरत येथून अटक करण्यात आली आहे. आरोपी कदम याच्यावर विरार परिसरात अनेक महिन्यांपासून तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला वसई न्यायालयात हजर केले. जिथून त्याला पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एका अल्पवयीन मुलीने विरार पोलिस ठाण्यात कमलेश कदम याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. मुलीच्या तक्रारीवरून, विरार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बलात्कार केलेल्या तीन मुलींपैकी दोन सख्ख्या बहिणी आहे. पोलिस पथक त्याला पकडण्यासाठी गेले तेव्हा तो घटनास्थळावरून पळून गेला. त्याच्या शोधासाठी एक पथक तयार करण्यात आले. अखेर आरोपीला सुरत येथून अटक करण्यात आली. आरोपी कमलेश कदम (४५) हा विरारमध्ये राहतो. त्याचा एक मित्र तुरुंगात आहे.

मित्राने त्याला त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलीची काळजी घेण्याची जबाबदारी दिली होती. यामुळे तुरुंगात असलेल्या मित्राच्या पत्नी आणि मुलीने आरोपी कदमच्या घरी आश्रय घेतला होता. पण जेव्हा मुलीची आई घराबाहेर पडायची तेव्हा आरोपी अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना तिच्यावर बलात्कार करायचा. आरोपीने मुलीला धमकी दिली की जर तिने याबद्दल कोणाला सांगितले तर तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील. तसेच आरोपीने शेजारी राहणाऱ्या दोन अल्पवयीन बहिणींवरही बलात्कार केला. आता या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून पुढील कारवाई सुरू आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *