मोठी बातमी! पेप्सिको, नेस्ले भारतात विकत आहेत निकृष्ट दर्जाची उत्पादने;वाढतोय लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका

लेखणी बुलंद टीम:

नेस्ले, पेप्सिको आणि युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय खाद्य कंपन्यांबाबत धक्कादायक दावा केला जात आहे. या कंपन्या भारतासारख्या कमी उत्पन्न असलेल्या देशात निकृष्ट दर्जाची उत्पादने विकत असल्याचे बोलले जात आहे. नॉन-प्रॉफिट ऑर्गनायझेशन ऍक्सेस टू न्यूट्रिशन इनिशिएटिव्ह (एटीएनआय) ने आपल्या अहवालात हे उघड केले आहे की नेस्ले, पेप्सिको आणि युनिलिव्हर सारख्या कंपन्यांद्वारे विकल्या जाणाऱ्या खाद्य उत्पादनांना आरोग्य रेटिंगमध्ये कमी गुण मिळाले आहेत, असा अहवाल बिझनेस स्टँडर्डने दिला आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, उच्च-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये विक्री केलेल्या उत्पादनांचा सरासरी स्कोअर 2.3 होता, तर कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हा सरासरी स्कोअर 1.8 वर घसरला.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने विकसित केलेल्या आरोग्य रेटिंग प्रणालीनुसार, उत्पादनास ३.५ पेक्षा जास्त गुण मिळाल्यास ते निरोगी मानले जाते. एटीएनआयचे संशोधन संचालक मार्क विजन यांनी या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आणि सरकारांना अन्न सुरक्षा मानकांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले. ते म्हणतात की हे स्पष्ट आहे की, या कंपन्यांनी कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये विकली जाणारी उत्पादने आरोग्यदायी नाहीत. हे विशेष चिंतेचे आहे, कारण यापैकी अनेक उत्पादनांमुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
भारतात लठ्ठपणाची समस्या

गेल्या काही दशकांपासून भारतात लठ्ठपणाची समस्या सातत्याने वाढत आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS-5) नुसार, भारतातील 15-49 वयोगटातील सुमारे 24% पुरुष आणि 24% स्त्रिया जास्त वजन किंवा लठ्ठ आहेत. यासोबतच शहरी भागातील 5-8% मुले आणि किशोरवयीन मुलांचे वजनही जास्त होत आहे.

मात्र, लठ्ठपणाच्या या वाढत्या समस्येला तोंड देण्यासाठी भारत सरकारने फिट इंडिया मूव्हमेंट आणि इट राइट इंडिया या मोहिमा सुरू केल्या आहेत. निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि लठ्ठपणाशी संबंधित समस्यांबद्दल जागरुकता वाढवणे हा या मोहिमांचा उद्देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *