मध्य रेल्वेने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरला जाण्यासाठी विशेष गाड्याचालवणार आहे. या गाड्या मुंबई, पुण्यासह विविध स्थानकातून सोडल्या जाणार आहेत. दरवर्षी १४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. हा दिवस भारतीय बौद्धांचा प्रमुख दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधव नागपूर येथे दीक्षा भूमी येथे जात असतात. या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी या साठी मुंबई/पुणे आणि नागपूर आणि नागपूर-भुसावळ-नाशिक रोड दरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे.
यात लोकमान्य टिळक टर्मिनस नागपूर अनारक्षित विशेष (०१०१७) ही गाडी मुंबई येथून रात्री २ वाजता सुटेल. नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ५ वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सिंदी आणि अजनी येथे थांबे असणार आहे. नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (०१०१८) ही गाडी १३ ऑक्टोंबर रोजी नागपूर येथून रात्री वाजून २० मिनीटांनी सुटेल. एलटीटी मुंबई येथे त्याच दिवशी ७ वाजता पोहोचेल.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या गाड्या ११ तारखेपासून चालवल्या जाणार आहेत. नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (०१२१८) गाडी १२ ऑक्टोंबर रोजी रात्री १० वाजून ५ मिनीटांनी सुटेल व ही गाडी दुसऱ्या दिवशी एलटीटी मुंबई येथे २ वाजून ३५ मिनीटांनी पोहोचल. ही गाडी सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे येथे थांबे घेणार आहे.